Kavita Mazhi

Monday, October 16, 2023

 मृगजळ

ही स्वप्नवेडी माया
कंठात दाटून येते
नाही नाही म्हणता
जाळ्यात गोवून नेते

हे पाश मोहबंधाचे
बिलगून घेती कुशीत
हळूच करकचून
घेती जीव मुठीत

हा भावाभोळा वाटे
का मृगजळाचे काटे?
उमगावे कसे कशास
मनानंद्ध काहूर दाटे

हा वेडा खेळ सारा
नेई अलवार वाहून
परतण्या मार्ग नाही
जीवात्मा जातो गुंतून

कालचक्र जन्मगतीचे 
फिरते एकामागून एक
मोक्षबिंदू दूर भासे
डुबलो पुरता त्यात

Savita BK

 छंदोरचना

वृत्त.....पादाकुलक 8 + 8
मा. समुपदेशक- श्री राजेंद्र उगले

सागरतीरी वाळूवरती


सागरतीरी वाळूवरती
लपलप लाटा खेळ खेळती
थंड गारवा स्पर्श मखमली
सरसर काटा अंगा वरती

माडांची ही सळसळ भारी
मनात विजोड हर्ष उभारी
संध्याकाळी दिशा फुलल्या
अवकाशाचा रंग केशरी

वाळूमध्ये पाय माखुनी
चालू लागे मन माघारी
सोनपावले आठवणींची
अलगद येती मनी दाटूनी

कातर वेळी मन एकांती
गत काळाची ओढ वाढवी
सागरतीरी भेट आपली
झाली होती एके काळी...

सविता ब कुंजीर (Savita BK)
राऊ समूह

 श्रीकृष्ण शरम :

शब्दमय श्रीहरी म्हणजे भागवत होय...

दिवाकर अनंत घैसास लिखित श्रीमत भागवत सार हा आत्मज्ञानाचा प्रकाश आहे. शब्दनं शब्दातून ओसांडणारा प्रकाशरूपी कवडासा हृदयातील भगवंताची चतुर्रभुज मूर्ती जागृत करते. श्रीमत भागवत हे परमतत्वाशी जोडण्याचा दुवा आहे, विष्णू भक्तांच्या भक्तीचा अथांग सागर आहे. विष्णूभक्तांच्या भक्तीप्रेमात न्हावून निघताना हृदयाचा कोपरा अन कोपरा द्रवल्याशिवाय रहात नाही.

सर्वसाक्षी विष्णुचे दशावतार तुमचं चित्त स्थिर
करून कमर्बंधनातून मुक्तीचा मार्ग दर्शवितात.
कलियुगात भक्तीचा सोपा मार्ग व्यासांनी आपल्यासाठी मोकळा करून दिला आहे. त्या कल्पतरूरुपी अतिमधुर फळाची अवीट गोडी जीवनाच्या मोह मायेतून मुक्ती मार्गस जाण्यास प्रवृत्त करून निवृत्तीचा मार्ग दाखवते. तन्मय होऊन त्या अथांग समुद्रात आपण मूक्तपणे विहार करू लागतो. तन मन हलक होतं आणि अश्रू भक्तीरूपाने मूक्त होतात, शब्द, भावना आणि मन  स्थिर होऊन मुकपणे वास्तवाशी समरस होण्यास स्फूर्ती प्रदान करतात.

मुक्तिमार्गाच्या वाटेला लागल्यानंतर प्रभुशी एकरूप होण्यापेक्षा, त्यानं दिलेलं हे जीवन आत्तापासूनच परमात्याशी एकरूप व्हावं असं मला वाटतं.

भागवताची बारा स्कंधामध्ये विभागणी केली आहे. संस्कृत पुरणातील गहन तत्वज्ञान, वंशपरंपरेची विस्तृत माहिती यात वर्णनिल्या आहेत. दशम स्कंधात कृष्णअवतारलीला वर्णली आहे. महर्षी व्यासांनी लिहिलेलं भागवत म्हणजे कलियुग वासियांसाठी मुक्तिधामाचा मार्गच आहे.
भगवताच्या अथांग सागरातून रसग्रहण करताना
ओजंळरुपी ज्ञान आपल्या माया मोहाच्या जाळीतून पटकन निसटून जात. त्याला साठवून ठेवायला ओंजळ घट्ट करावी लागते. मोह मायेच्या जाळ्याला बांध घालावे लागतात. हे करण्यासाठी सातत्य ठेवून निरंतन भागवताच्या डोहात डुंबावं लागत.

विष्णुभक्तांच्या विविध कथा शुकदेवांनी
परीक्षिताला सांगितल्या. राजा भरत, ध्रुव,पृथु अजामीळा, प्रहाद, सुदामा, ऋषभदेव याच्या भक्ती प्रवास सांगितला असून, भक्तीच्या विविध छटा त्यातून आपल्याला दिसून येतात. या भक्तांनी परमेश्वर प्राप्ती साठी केलेले प्रयास आपल्या खुज्या प्रववृत्तीची जाणीव करून देतात. सकाम भक्ती ध्रुवाची होती, निष्काम भक्ती पृथुराजाची, पृथु राजाला साक्षात श्रीहरी प्रसन्न झाले आणि वरदान मागायला सांगितलं. राजा म्हणाला मला तू वरदानाच आमिष दाखवून या संसार चक्रात गोवू नको, दिलाच तर तूझ्या भक्तीच निरंतन दान दे. सुदामा मागूच शकला नाही आणि त्यानी त्याला कमी पडू दिल नाही. जस भक्तांच्या मनात सतत नारायणाच स्मरण असतं तसंच आपल्या भक्तांच स्मरण हरिच्या हृदयात चालू असतं. कृष्ण म्हणतो एक वेळ मी रुक्मिणीला विसरेन पण माझ्या भक्तांना नाही. तुम्ही समजून जा आणि त्याच्या प्रेममयी विश्वात स्वतःला सहभागी करून घ्या. Savita B Kunjir